जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आहे. या संदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती वरून, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह राहायला आहे. शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिला घरी असताना गावात राहणारा ईश्वर राजाराम गायकवाड हा घरी येऊन तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच आरडा – ओरड केली तर तुला जिवंत मारून टाकीन अशी धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाह महिलेने जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता संशयित आरोपी ईश्वर राजाराम गायकवाड यांच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार करीत आहे.