जळगाव ( प्रतिनिधी ) – आज महाराष्ट्र दिनानिमित्त..जळगाव भूलतज्ञ संघटनेतर्फे पोलीस अधिकारी व ट्रॅफिक पोलिस यांच्यासाठी जीवन संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
विजेचा झटका लागणे , गळफास , हृदयविकाराच्या झटक्याने खाली पडणे , पाण्यात बुडालेला व्यक्ती बाहेर काढल्यावर प्रथम ती व्यक्ती जिवंत आहे का नाही ? , याचे चिन्ह कोणते , जीवनचिन्ह नसेल तर १०८ ला फोन करून मदत मिळेपर्यंत त्या व्यक्तीला सुरक्षित जागेवर नेवून लगेच हातानी छातीच्या मध्यभागी ..३० ,३० कंप्रेशन चे ५ सायकल देणे ; जेणेकरून हृदय चालू होऊन मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होऊन त्या व्यकीचे प्राण वाचविण्यात मदत होते. या सर्व बाबींचे डमीद्वारे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले .
यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप गावित , संतोष सोनवणे यांच्यासह १०० हून अधिक महिला पोलिस आणि १५० वरून अधिक पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
डॉ प्रकाश सुरवाडे, डॉ ललित पाटील , डॉ धीरज चौधरी , डॉ लीना पाटील , डॉ अमित हीवरकर , डॉ ऋतुराज पाटील या डॉक्टरांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
प्रत्येक नागरिक जीवन रक्षक बनू शकतो अशा प्रसंगात कोणतीही कायद्याची भीती न बाळगता त्या व्यक्तीला योग्य वेळी सीपीआर मिळाला तर ३० टक्के रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढले आहे असे सिद्ध झाले आहे , अशी माहिती यावेळी संयोजकांनी दिली.